का आठवतोस तू मला आभाळ भरून आल्यावर
मनातले विचार दाबून ठेवलेले
का कोसळतात ते अश्रुंबरोबर
दाटलेले मेघ आणि मन
साचलेले तळे आणि डोळे
सुटलेला वारा आणि तुझा आवाज
पावसाची सर आणि तुझी आठवण
हे सगळं व्हायलाच हवं का?
जीव घेतो हा पावसाळा
जो तू अर्धा इथे ठेवून गेला आहेस...
-ऋ तू जा