पापण्या मिटतो न मिटतो
आभास तुझाच ..
प्रत्येक श्वासागणिक
आस तुझीच
गंध तुझाच
वाट बघत असताना
का मन असत तिथेच
स्तब्ध
भावना का असतात
गोठलेल्या ?
डोळे का बरे असतात
नि:शब्द ?
सांजवेळ का अजुनही
धूसरच ?
पाऊस पडला जरी
का अजूनही कोरडाच ?
हलकासा तुझा तो स्पर्श
अजूनही ओलसर
जणू काही
पुस्तकात ठेवलेले पान
अजूनही ताजेच
थंडगार हृदय माझे
का श्वास मात्र उष्ण?
प्रत्येक प्रश्नच उत्तर असूनही
प्रत्येक उत्तरमागे
प्रश्न का ?
No comments:
Post a Comment