कधी कधी शब्द संपतात,
पण आठवणी संपत नाहीत…
कधी कधी ओठ शांत असतात,
पण हृदय ओरडतं…..
कधी कधी आपण हसतो,
पण आतून तुटून पडतो…
खरं सांगायचं तर,
नातं किती दिवस टिकतं हे महत्त्वाचं नसतं,
पण ते नातं आपल्याला किती जिवंत ठेवतं हे महत्त्वाचं असतं.......
आजही तुला आठवलं की,
डोळ्यांच्या काठावर पाणी थांबत नाही,
कारण तू फक्त व्यक्ती नाहीस…..
तू आठवण झाला आहेस…
आणि आठवणी कधीच मरत नाहीत......
No comments:
Post a Comment